Drama Theater : वडाळा आणि घाटकोपरमध्ये लवकरच लघु नाट्यगृहे होणार खुली

बाल नाटकांसह प्रायोगिक नाटकांच्या तालिमींसाठी ठरणार पर्वणी


तब्बल आठ ते नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या या वास्तू


मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत आरक्षण समायोजनाअंतर्गत विकासकांकडून बांधीव इमारत महापालिकेला हस्तांतरीत झाल्यानंतरही त्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने आजही या वास्तू धुळखात पडल्या आहेत. अशाचप्रकारे नाट्यगृहाच्या दोन वास्तू वडाळा आणि घाटकोपर पूर्व विभागांत आठ ते नऊ वर्षांपासून महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या. परंतु त्या नाट्यगृहाच्या इमारतींचा वापर महापालिकेने न केल्याने या वास्तू आता पडिक बनल्या असून आता याच नाट्यगृहांचे नुतनीकरण करून महापालिका ही लघु नाट्यगृहे लोकांसाठी खुली करणार आहे.



मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वडाळा आणि घाटकोपर येथे लघु नाट्यगृहाच्या जागेचे नुतनीकरण करून त्यांचे लोकार्पण केले जाईल अशी घोषणा केली. ही दोन्ही नट्यगृहे २५० आसन क्षमतेची असून सन २०१५-१६ मध्ये संबंधित विकासकाने महापालिकेला बांधून महापालिका विभाग कार्यालयाला हस्तांतरीत केली आहे.



वडाळा येथे दोस्ती एकर्स ठिकाणी तर घाटकोपर पूर्व येथे जैन मंदिर शेजारी या नाट्यगृहाच्या इमारती महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या. परंतु या नाट्यगृहातील आसन क्षमता कमी असल्याने मोठ्या नाट्यगृहांसाठी या वास्तू उपलब्ध करून देता आल्या नाहीत. या वास्तूंमध्ये लिफ्टसह वातानुकुलित यंत्रणासह सुसज्ज अशा इमारती असल्या तरी मागील आठ ते नऊ वर्षांपासून या वास्तू बंद असल्याने त्या पडिक बनल्या आहेत.त्यामुळे या दोन्ही वास्तूंचे स्टक्चरल ऑडीट तसेच इलेक्टीकल ऑडीट आणि साफसफाई आदींची कामे केली जाणार आहेत. त्यानुसार या नाट्यगृहाच्या इमारतींच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.



त्यामुळे येत्या काही महिन्यांतच ही लघुनाट्यगृहे लोकांसाठी खुली केली जाणार आहे. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी पुढाकार घेवून या वास्तूंमध्ये लघु नाट्यगृहे सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही केली होती, त्यानुसार या विभागाने आता पुढील कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या दिवसांमध्ये ही लघु नाट्यगृहे बाल नाटकांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. या लघु नाट्यगृहांचा लाभ बाल नाटकांना तसेच प्रायोगिक नाटकांच्या तालिमींकरता केला जावू शकतो.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात