Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन!

मुंबई : गणेशोत्सव हा सर्वांच्या जवळचा विषय आहे. १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणपती उत्सव आजही कायम आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने बाप्पाची वाट बघत असतात. बाप्पाला घरी घेऊन येण्यापासून ते विसर्जनापर्यंत भक्तांचा उत्साह कायम असतो. मात्र यावर्षी मुंबईतील काही भागात माघी गणेशोत्सवाला स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळ्याला महानगरपालिकेने विरोध केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज ११व्या दिवशी या मूर्तींचे विसर्जन करण्याचे निर्देश मंडळांना मिळाले आहेत.



कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपचा राजा गणेश जयंतीला (दि १ फेब्रुवारी ) मंडळात स्थापित झाला. या मूर्तीची हुबेहूब प्रतिमा लालबागच्या राजासारखी आहे. येथे दर्शनासाठी भाविक फार दुरून येतात. ही मूर्ती पीओपीची असल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचं विसर्जन करण्यास मनाई केली होती. मार्वे समुद्रावर पोलिसांनी मंडळाला अडवून या मूर्तीला परत घेऊन जाण्यास सांगितलं. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते.



महानगरपालिकेच्या या निर्णयावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाविकांमध्ये भडका उडाला. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान आता महानगरपालिकेने यावर तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना