मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
जोगेश्वरी येथील ओशिवरा परिसरात असलेल्या लाकडाच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली आहे. १० ते १२ सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या दुकानांना लागली असून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत अधिकचे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…