Bhushan Gawai : न्यायमूर्ती गवईंचे हेलिकॉप्टर भरकटले, सुखरूप लँडिंग

अमरावती : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी धारणी येथे विधी सेवा महाशिबिराला उपस्थित राहण्यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने रविवारी उड्डाण केले. मेळघाटात प्रवेश करताच नेटवर्क कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने पायलटसह धारणीतील आयोजकांची पाच ते सात मिनिटे भंबेरी उडाली. हेलिकॉप्टर लैंड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास नागपूरहून निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. रेवती डेरे, न्या. वासुदेव सांबरे यामध्ये होते.


मेळघाट जंगल परिसरात आल्यानंतर अचानक हेलिकॉप्टरची नेटवर्क कनेक्टिव्हिटी गेली. त्यामुळे पाच ते सात मिनिटे हेलिकॉप्टर भरकटले आणि सर्वांना घाम फुटला. काही काळ हवेत घिरट्या घातल्यानंतर चॉपरला नियोजित मार्ग मिळाल्यानंतर ते धारणी मार्गावर आले आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला,अशी माहिती स्वतः न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्यापूर्वीच कारने धारणी गाठले होते.



पोलिसांचे केले कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या ४० स्टॉलना भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्याच्या स्टॉलसमोर आले असता, ठाणेदार अशोक जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्यासमक्ष आल्यानंतर त्यांनी लावण्यात आलेल्या सूचना फलकाचे अवलोकन केले आणि माहिती घेतली. धारणी पोलिसांनी मिसिंग झालेले ३५ मोबाइल सोहळ्यादरम्यान परत केल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सायबर क्राइम, क्राइम अगेन्स्ट वूमन, बालविवाह, रस्ता सुरक्षा सप्ताह आणि डायल ११२ याबाबत लावण्यात आलेल्या फलकाचे कौतुक न्यायमूर्तीनी केले.

Comments
Add Comment

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने