Bhushan Gawai : न्यायमूर्ती गवईंचे हेलिकॉप्टर भरकटले, सुखरूप लँडिंग

  116

अमरावती : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी धारणी येथे विधी सेवा महाशिबिराला उपस्थित राहण्यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने रविवारी उड्डाण केले. मेळघाटात प्रवेश करताच नेटवर्क कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने पायलटसह धारणीतील आयोजकांची पाच ते सात मिनिटे भंबेरी उडाली. हेलिकॉप्टर लैंड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास नागपूरहून निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. रेवती डेरे, न्या. वासुदेव सांबरे यामध्ये होते.


मेळघाट जंगल परिसरात आल्यानंतर अचानक हेलिकॉप्टरची नेटवर्क कनेक्टिव्हिटी गेली. त्यामुळे पाच ते सात मिनिटे हेलिकॉप्टर भरकटले आणि सर्वांना घाम फुटला. काही काळ हवेत घिरट्या घातल्यानंतर चॉपरला नियोजित मार्ग मिळाल्यानंतर ते धारणी मार्गावर आले आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला,अशी माहिती स्वतः न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्यापूर्वीच कारने धारणी गाठले होते.



पोलिसांचे केले कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या ४० स्टॉलना भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्याच्या स्टॉलसमोर आले असता, ठाणेदार अशोक जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्यासमक्ष आल्यानंतर त्यांनी लावण्यात आलेल्या सूचना फलकाचे अवलोकन केले आणि माहिती घेतली. धारणी पोलिसांनी मिसिंग झालेले ३५ मोबाइल सोहळ्यादरम्यान परत केल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सायबर क्राइम, क्राइम अगेन्स्ट वूमन, बालविवाह, रस्ता सुरक्षा सप्ताह आणि डायल ११२ याबाबत लावण्यात आलेल्या फलकाचे कौतुक न्यायमूर्तीनी केले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक