अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

वसई : प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे विकास वालकर यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील मानसिक तणावाखाली वावरत होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचे वसईतील घरी निधन झाले.



श्रद्धाची २०२२ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. टप्प्याटप्प्याने तो श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले होते.



वसईतून आफताबसोबत दिल्लीला गेलेल्या श्रद्धाशी दीड महिन्यापासून संपर्क होत नसल्यामुळे विकास वालकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. श्रद्धा आणि आफताच्या नात्याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी आफताबच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. आफताबचा संशय वाटू लागल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून श्रद्धाच्या हत्येची माहिती पोलिसांच्या हाती आली. सध्या श्रद्धाच्या हत्येच्या आरोपात आफताब दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.
Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.