अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

  117

वसई : प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे विकास वालकर यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील मानसिक तणावाखाली वावरत होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचे वसईतील घरी निधन झाले.



श्रद्धाची २०२२ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. टप्प्याटप्प्याने तो श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले होते.



वसईतून आफताबसोबत दिल्लीला गेलेल्या श्रद्धाशी दीड महिन्यापासून संपर्क होत नसल्यामुळे विकास वालकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. श्रद्धा आणि आफताच्या नात्याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी आफताबच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. आफताबचा संशय वाटू लागल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून श्रद्धाच्या हत्येची माहिती पोलिसांच्या हाती आली. सध्या श्रद्धाच्या हत्येच्या आरोपात आफताब दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत