अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

वसई : प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे विकास वालकर यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील मानसिक तणावाखाली वावरत होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचे वसईतील घरी निधन झाले.



श्रद्धाची २०२२ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. टप्प्याटप्प्याने तो श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले होते.



वसईतून आफताबसोबत दिल्लीला गेलेल्या श्रद्धाशी दीड महिन्यापासून संपर्क होत नसल्यामुळे विकास वालकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. श्रद्धा आणि आफताच्या नात्याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी आफताबच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. आफताबचा संशय वाटू लागल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून श्रद्धाच्या हत्येची माहिती पोलिसांच्या हाती आली. सध्या श्रद्धाच्या हत्येच्या आरोपात आफताब दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.
Comments
Add Comment

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम

पुण्यात पेट्रोल महागले, इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली