पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी

पिंपरी : पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी झाली. ही घटना पिंपरीतील मोशी परिसरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडली. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी भूक लागली म्हणून खाण्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला. बाहेरुन खाण्यासाठी पदार्थ मागवण्यात आल्याचे लक्षात येताच हॉस्टेलच्या सुपरवायझर मिनाक्षी नारहारे यांनी पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या मुलींची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली.



एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनींपैकी नेमका कोणी पिझ्झा ऑर्डर केला हे कळले नाही म्हणून चौघींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली. हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलेल्या चौघींना एक महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.



विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन हॉस्टेलमध्ये बाहेरुन पदार्थ ऑर्डर करुन मागवण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन झाले म्हणून चार विद्यार्थिनींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यार्थिनींवर झालेल्या कारवाईमुळे त्यांचे पालक नाराज असल्याचे वृत्त आहे. समाजिक न्याय विभागाने बाहेरुन पदार्थ मागवणाऱ्यांना थेट हॉस्टेलमधून बाहेर काढण्याबाबत सरकारी आदेश काढला आहे का ? की सुपरवायझर यांनी परस्पर चार विद्यार्थिनींनी हॉस्टेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे; असा प्रश्न विद्यार्थिनींचे पालक उपस्थित करत आहेत.
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,