पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी

पिंपरी : पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी झाली. ही घटना पिंपरीतील मोशी परिसरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडली. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी भूक लागली म्हणून खाण्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला. बाहेरुन खाण्यासाठी पदार्थ मागवण्यात आल्याचे लक्षात येताच हॉस्टेलच्या सुपरवायझर मिनाक्षी नारहारे यांनी पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या मुलींची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली.



एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनींपैकी नेमका कोणी पिझ्झा ऑर्डर केला हे कळले नाही म्हणून चौघींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली. हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलेल्या चौघींना एक महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.



विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन हॉस्टेलमध्ये बाहेरुन पदार्थ ऑर्डर करुन मागवण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन झाले म्हणून चार विद्यार्थिनींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यार्थिनींवर झालेल्या कारवाईमुळे त्यांचे पालक नाराज असल्याचे वृत्त आहे. समाजिक न्याय विभागाने बाहेरुन पदार्थ मागवणाऱ्यांना थेट हॉस्टेलमधून बाहेर काढण्याबाबत सरकारी आदेश काढला आहे का ? की सुपरवायझर यांनी परस्पर चार विद्यार्थिनींनी हॉस्टेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे; असा प्रश्न विद्यार्थिनींचे पालक उपस्थित करत आहेत.
Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ