Rahul Solapurkar : 'आंबेडकर ब्राम्हण, त्यांना दत्तक घेतलेलं' सोलापूरकरचे पुन्हा वादग्रस्त विधान चर्चेत!

  163

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते राहुल सोलापूरकरने (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमी, राजकीय नेते यांसह संपूर्ण राज्यभरात असंतोष निर्माण झाला होता. शिवरायांबाबत केलेल्या विधानामुळे राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकरचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राहुल सोलापूरकरने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले आहे. वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात, असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरने एका मुलाखतीमधून केले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे.



काय म्हणाला सोलापूरकर?


'रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, जो एक आंबेडकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्याने प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसे म्हटले आहे. सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण: म्हणजे अभ्यास करुन तो मोठा झालेला आहे. तसे त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात', असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरने केले आहे.



आंबेडकरी संघटना आक्रमक


सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे सोलापूरकरने आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.


Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून