कधी होणार भारत - इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ? कसा आणि कधी बघता येणार ?

कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका भारताने ४ - १ अशी जिंकली. यानंतर सुरू झालेल्या भारत - इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने चार गडी राखून जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामना रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून कटक येथे सुरू होणार आहे. कटकच्या बाराबती स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर आणि थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर होणार आहे.



मालिकेत भारताने १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे कटकमध्ये जिंकून टीम इंडियाला मालिका २ - ० अशी जिंकण्याची संधी आहे.



कटकच्या सामन्यासाठी अंतिम संघ या खेळाडूंमधून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती , वॉशिंगटन सुंदर , विराट कोहली , रिषभ पंत, अर्शदीप सिंग

इंग्लंड : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक) , जोस बटलर (कर्णधार) , बेन डकेट , जो रूट , हॅरी ब्रूक , जेकब बेथेल , लियाम लिव्हिंगस्टोन , ब्रायडन कार्स , आदिल रशीद , जोफ्रा आर्चर , साकिब महमूद , गस अ‍ॅटकिन्सन , मार्क वूड , जेमी ओव्हरटन , जेमी स्मिथ



भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय सामन्यांची मालिका, सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू

  1. पहिला सामना - भारताचा चार गडी राखून विजय

  2. दुसरा सामना - बाराबती स्टेडियम, कटक

  3. तिसरा सामना - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)