Ladki Bhahin scheme : लाडकी बहीण योजनेत नवीन निकष नाही

पुणे : लाडकी बहीण योजनेत (Ladki Bhahin scheme) कोणताही नवीन निकष नाही, काही बहिणी त्या निकषाबाहेर गेल्या असल्याने त्यांनी योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच दिल्ली विधानसभेत भाजपला मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखविलेला विश्वास आहे, असे नमूद केले. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.


पुणे दौऱ्यात हिंदू गर्जना केसरी स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पत्रकार परीषदेत ते बोलत होते. स्पर्धेचे आयोजक धीरज घाटे आणि उद्योजक पुनीत बालन यावेळी उपस्थित होते.



लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारले असता, फडणवीस म्हणाले, 'आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडीयन आहोत, आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो निश्चित बंद केला जाईल, त्याची आम्ही सुरुवात केली आहे. योजनेसाठी कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते. त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे.

Comments
Add Comment

कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली

सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून

एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं?

मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून

श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी