ठाण्याला मिळणार दोन वर्षात वाढीव पाणी

  50

ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्याने जाणवत असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाचामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.


ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहराच्या पाणी आराखड्याबाबत माहिती दिली.


ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल. यामुळे २०२६ मध्येच ठाणे शहरात पुढील २०३५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असा दावा आयुक्त राव यांनी केला.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची