ठाण्याला मिळणार दोन वर्षात वाढीव पाणी

ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्याने जाणवत असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाचामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.


ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहराच्या पाणी आराखड्याबाबत माहिती दिली.


ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल. यामुळे २०२६ मध्येच ठाणे शहरात पुढील २०३५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असा दावा आयुक्त राव यांनी केला.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये