ठाण्याला मिळणार दोन वर्षात वाढीव पाणी

ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्याने जाणवत असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाचामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.


ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहराच्या पाणी आराखड्याबाबत माहिती दिली.


ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल. यामुळे २०२६ मध्येच ठाणे शहरात पुढील २०३५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असा दावा आयुक्त राव यांनी केला.

Comments
Add Comment

एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत