वाढवण महामार्ग ३४८६ कोटींचा

  128

डहाणू : पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ आशिया खंडातले सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. या बंदराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचीही योजना तयार आहे. या महामार्गासाठी ३४८५.९९ कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन आहे. एकूण ३२.२८ किमी लांबीचा महामार्ग उभारला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्ग उभारणीची तयारी सुरू केली आहे. यासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार आहे.





वाढवण बंदर उभे झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तेथे दररोज ५० हजार मालवाहक वाहनांची ये - जा होईल, असा अंदाज आहे. यासाठी एनएचएआय चार येण्याच्या आणि चार जाण्याच्या अशा आठ मार्गिका असलेला अर्थात आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहे.



हा महामार्ग वरोर येथून सुरू होऊन बावडा, सुमाडी, चिंचारे, नानीवली ते तवा असा असेल. यादरम्यान हा महामार्ग रेल्वेचा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर, सध्याचा पश्चिम रेल्वेमार्ग, बांधकामाधीन बुलेट ट्रेन मार्ग, बांधकामाधीन बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग यांना पार करून राष्ट्रीय महामार्ग ४८ला तवा येथे जोडला जाईल. याला चिंचारे येथे बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी तर सुमाडी येथे बुलेट ट्रेनच्या बोईसर स्थानकासाठी इंटरचेंज अर्थात आंतरबदल असेल.

प्रस्तावीत महामार्गावर दोन बोगदे असतील. त्यातील एक बोगदा सुमाडी ते रावतेदरम्यान वनक्षेत्रादरम्यान असेल. दोन मोठे पूल, १९ लहान पूल, तीन उड्डाणपूल, सात अंडरपास, २० हलक्या वाहनांचे व १० लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग असतील.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी