वाढवण महामार्ग ३४८६ कोटींचा

  83

डहाणू : पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ आशिया खंडातले सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. या बंदराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचीही योजना तयार आहे. या महामार्गासाठी ३४८५.९९ कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन आहे. एकूण ३२.२८ किमी लांबीचा महामार्ग उभारला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्ग उभारणीची तयारी सुरू केली आहे. यासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार आहे.





वाढवण बंदर उभे झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तेथे दररोज ५० हजार मालवाहक वाहनांची ये - जा होईल, असा अंदाज आहे. यासाठी एनएचएआय चार येण्याच्या आणि चार जाण्याच्या अशा आठ मार्गिका असलेला अर्थात आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहे.



हा महामार्ग वरोर येथून सुरू होऊन बावडा, सुमाडी, चिंचारे, नानीवली ते तवा असा असेल. यादरम्यान हा महामार्ग रेल्वेचा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर, सध्याचा पश्चिम रेल्वेमार्ग, बांधकामाधीन बुलेट ट्रेन मार्ग, बांधकामाधीन बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग यांना पार करून राष्ट्रीय महामार्ग ४८ला तवा येथे जोडला जाईल. याला चिंचारे येथे बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी तर सुमाडी येथे बुलेट ट्रेनच्या बोईसर स्थानकासाठी इंटरचेंज अर्थात आंतरबदल असेल.

प्रस्तावीत महामार्गावर दोन बोगदे असतील. त्यातील एक बोगदा सुमाडी ते रावतेदरम्यान वनक्षेत्रादरम्यान असेल. दोन मोठे पूल, १९ लहान पूल, तीन उड्डाणपूल, सात अंडरपास, २० हलक्या वाहनांचे व १० लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग असतील.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या