दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय जनता पार्टी ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यामुळे 'दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ' असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. पिछाडीवर असलेल्यांमध्ये 'आप'चे प्रमुख नेते पण आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)

दिल्लीत भाजपाची सत्ता आली तर दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. दिल्लीतील वाहतूक समस्या, प्रदूषण, शिक्षण, रोजगार आदी समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर अजून निकाल जाहीर झालेला नाही. थोडा वेळ थांबा, अशी प्रतिक्रिया 'आप'चे कार्यकर्ते देत आहेत.



याआधी दिल्लीत मतदानाच्यावेळी गडबड झाल्याची दावा आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने केला. पण दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला अद्याप ठोस पुरावे सादर केलेले नाही. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतल्याचे जाहीर केले आणि योग्य शब्दात स्पष्टीकरण लवकरच देणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक कशी योग्य प्रकारे झाली, हे स्पष्ट करणारी आकडेवारी देऊ, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा आरडाओरडा म्हणून पराभवाची कारणे सांगण्याची पूर्वतयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या