दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय जनता पार्टी ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यामुळे 'दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ' असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. पिछाडीवर असलेल्यांमध्ये 'आप'चे प्रमुख नेते पण आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)

दिल्लीत भाजपाची सत्ता आली तर दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. दिल्लीतील वाहतूक समस्या, प्रदूषण, शिक्षण, रोजगार आदी समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर अजून निकाल जाहीर झालेला नाही. थोडा वेळ थांबा, अशी प्रतिक्रिया 'आप'चे कार्यकर्ते देत आहेत.



याआधी दिल्लीत मतदानाच्यावेळी गडबड झाल्याची दावा आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने केला. पण दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला अद्याप ठोस पुरावे सादर केलेले नाही. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतल्याचे जाहीर केले आणि योग्य शब्दात स्पष्टीकरण लवकरच देणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक कशी योग्य प्रकारे झाली, हे स्पष्ट करणारी आकडेवारी देऊ, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा आरडाओरडा म्हणून पराभवाची कारणे सांगण्याची पूर्वतयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित