Delhi Assembly Election 2025: काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस पक्ष ७० सदस्यीय विधानसभेमध्ये सलग तिसऱ्यांदा आपले खाते खोलण्यास अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये २.१ टक्क्यांची थोडीशी सुधारणा झाली आहे. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दावा केला आहे की ते लोकांचा विश्वास पुन्हा जिंकतील आणि २०३०मध्ये आपले सरकार बनवतील.


दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ झाला आहे. पक्षाच्या अधिकतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेसचे केवळ तीन उमेदवार आपले डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचवू शकले. यात कस्तुरबा नगर येथून अभिषेक दत्त जे दुसऱ्या स्थानावर राहणारे एकमेव काँग्रेस नेते आहेत. या यादीत नांगलोई जाट येथून रोहित चौधरी आणि बादली येथून देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. अधिकतर काँग्रेस उमेदवार हे भाजप अथवा आपनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. मात्र काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार एआयएमएआयएच्या उमेदवारांच्याही मागे राहिले.




 

काँग्रेसने केला 'आप'चा गेम


काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये थोडीशी सुधारणा ही आप पक्षासाठी चांगलीच महागडी ठरली.या निवडणुकीत काँग्रेसने आपचा गेम केला. अनुसूचित जाती आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. निवडणुकीत आपच्या वोट शेअरमध्ये १० टक्के घसरण झाली. आम आदमी पक्षाला ४३.१९ टक्के मते मिळालीतर २०२०च्या निवडणुकीत ५३.६ टक्के वोट शेअर मिळाले होते.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी