Delhi Assembly Election 2025: काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस पक्ष ७० सदस्यीय विधानसभेमध्ये सलग तिसऱ्यांदा आपले खाते खोलण्यास अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये २.१ टक्क्यांची थोडीशी सुधारणा झाली आहे. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दावा केला आहे की ते लोकांचा विश्वास पुन्हा जिंकतील आणि २०३०मध्ये आपले सरकार बनवतील.


दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ झाला आहे. पक्षाच्या अधिकतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेसचे केवळ तीन उमेदवार आपले डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचवू शकले. यात कस्तुरबा नगर येथून अभिषेक दत्त जे दुसऱ्या स्थानावर राहणारे एकमेव काँग्रेस नेते आहेत. या यादीत नांगलोई जाट येथून रोहित चौधरी आणि बादली येथून देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. अधिकतर काँग्रेस उमेदवार हे भाजप अथवा आपनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. मात्र काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार एआयएमएआयएच्या उमेदवारांच्याही मागे राहिले.




 

काँग्रेसने केला 'आप'चा गेम


काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये थोडीशी सुधारणा ही आप पक्षासाठी चांगलीच महागडी ठरली.या निवडणुकीत काँग्रेसने आपचा गेम केला. अनुसूचित जाती आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. निवडणुकीत आपच्या वोट शेअरमध्ये १० टक्के घसरण झाली. आम आदमी पक्षाला ४३.१९ टक्के मते मिळालीतर २०२०च्या निवडणुकीत ५३.६ टक्के वोट शेअर मिळाले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला