‘मालक समजणाऱ्या अहंकार, अराजकतेचा पराभव’

पंतप्रधान मोदींनी लगावला केजरीवालांना टोला


नवी दिल्ली : दिल्लीतील २७ वर्षांनंतरच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपाच्या मुख्यालयामध्ये विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी मोदी यांनी आपवर निशाना साधला. हा ऐतिहासिक विजय आहे, दिल्लीच्या लोकांनी आप-दा ला बाहेर केले आहे. आज अहंकार, अराजकतेचा पराभव झाला आहे. ज्यांना मालक होण्याचा गर्व होता, त्यांचा खऱ्याशी सामना झाला आहे, अशा शब्दांत मोदींनी आपला तसेच केजरीवालांना टोला लगावला आहे.


दिल्लीतील प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. मला दिल्लीच्या जनतेने कधी निराश केले नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सातही जागांवर विजय दिला आहे. भाजपला २१ व्या शतकात सेवा करण्याची संधी द्यावी, असे मी आवाहन केले होते. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले. शॉर्टकट राजकारणाचा शॉर्ट सर्किट झाल्याचा टोला मोदींनी लगावला.



तत्पूर्वी जे पी नड्डा यांनी देखील आपवर टीका केली. पूर्वी राजकारण म्हणजे लोकाभिमानी भाषणे देणे आणि नंतर ते विसरून जाणे असे होते, परंतु पंतप्रधान मोदींनी राजकारणात बदल घडवून आणला. मी जे बोललो ते केले आणि जे बोललो नाही तेही केले. ही निवडणूक सर्वात बेईमान नेत्याला आणि सर्वात बेईमान पक्षाला संदेश देईल. ज्यांनी कचरा हटवण्याचे म्हटले, त्यांनी प्रत्येक घरासमोर कचरा टाकला. शिक्षणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांनी दिल्लीतील दोन तृतीयांश मुलांना विज्ञान शिकण्यापासून दूर ठेवले. जे चांगल्या रस्त्यांबद्दल बोलत होते, त्यांनी लोकांना खड्ड्यांतून चालण्यास भाग पाडले. जनतेने अशा पक्षाला घरी पाठवले आहे, असे नड्डा म्हणाले.


स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक असल्याचा दावा केला ते पूर्णपणे भ्रष्ट निघाले. तुरुंगात वेळ घालवून त्यांचे नेते परत आले आहेत. तर काँग्रेस शुन्यावर आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. यामुळे, आम्ही इतिहास घडवला असल्याचे नड्डा म्हणाले.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा