Water Shortage : अलिबागकरांवर पाणीटंचाई! ४७ गावांतील नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

अलिबाग : अलिबाग येथील उमटे धरणातून (Alibaug Umte Dam) मिळणाऱ्या पाण्यातून ४७ गावांतील लाखो नागरिकांची तहान भागवली जाते.  या धरणातील पाण्यावर तालुक्यातील गावे अवलंबून आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी डिसेंबर महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यात येते. मात्र यंदा ही पाणीकपात फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंत अलिबागकरांवर पाणीटंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरण बांधून ४७ वर्षे झाली असून, धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागले आहे.


दरम्यान, गाळ काढण्याकडे राजिपचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेकापच्या माध्यमातून आणि राजिपच्या परवानगीने या धरणातील काहीअंशी गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने हे गाळ काढणे थांबले गेले. मात्र धरणात पाणी असल्याने गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. (Water Shortage)


उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, पावसाळा येईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात ५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील गाळ मार्च महिन्यापासून पाणी पातळी कमी झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने