Water Shortage : अलिबागकरांवर पाणीटंचाई! ४७ गावांतील नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

अलिबाग : अलिबाग येथील उमटे धरणातून (Alibaug Umte Dam) मिळणाऱ्या पाण्यातून ४७ गावांतील लाखो नागरिकांची तहान भागवली जाते.  या धरणातील पाण्यावर तालुक्यातील गावे अवलंबून आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी डिसेंबर महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यात येते. मात्र यंदा ही पाणीकपात फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंत अलिबागकरांवर पाणीटंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरण बांधून ४७ वर्षे झाली असून, धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागले आहे.


दरम्यान, गाळ काढण्याकडे राजिपचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेकापच्या माध्यमातून आणि राजिपच्या परवानगीने या धरणातील काहीअंशी गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने हे गाळ काढणे थांबले गेले. मात्र धरणात पाणी असल्याने गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. (Water Shortage)


उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, पावसाळा येईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात ५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील गाळ मार्च महिन्यापासून पाणी पातळी कमी झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा