Mumbai Breaking News : सावधान! मुंबईमध्ये GBS चा पहिला रुग्ण आढळला

मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात घोंगावत असलेल्या GBS आजाराने आता मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईतील अंधेरी भागात एका पुरुषाला गुइलेन - बॅरे - सिंड्रोम झाल्याचे आढळले आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु अद्याप बीएमसीकडून अधिकृतरित्या ही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.



मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात जीबीएस आजाराने शिरकाव केला आहे. एका व्यक्तीला या आजाराची लागण झाली असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएस आजाराच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसंच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली.



शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. पुणे, सोलापूर सारख्या शहरांनंतर गुइलेन - बॅरे - सिंड्रोमच्या शिरकाव्यामुळे मुंबईकर भयभीत झाले आहेत. पुण्यात आज या आजाराने एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ६ वर पोहचली आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला