मीरा-भाईंदर शहरात डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो धावणार

मीरा-भाईंदर (प्रतिनिधी): मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग १ चे काम जलदगतीने सुरू असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून, डिसेंबर २०२५ मध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे. मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होती. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्यावाचत आणि भविष्यातील बोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर उपस्थितीत होते. यावेळी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० पैकी ३ मार्गिका या अवजड वाहनांसाती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याचावत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्त संजम काटकर यांनी दिली. मिरा भाईंदर शहरात दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९ तयार करण्यात येत आहे, कंत्राटदाराला देखील २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या या प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गकिचे काम पूर्ण केले जात आहे. या मेट्रो मार्गीका ९ चे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. दहिसर ते सुभाषचंद्र बोस पर्यंत टप्पा-१ आणि पुढील टप्प्यात उत्तन पर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. दुसऱ्या टण्यात मेट्रो मार्ग आणि कारशेडचे काम केले जाणार आहे. मेट्रो मार्गकिच्या मूळ मार्गावर स्थानिक नागरिकांची घरे बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध असल्याने त्यावर पुढील महिन्यात एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेऊन घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रपत्न केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली, मिरा भाईंदर शहराच्या मुख्यमार्गावर मेट्रो रेल्वे खाली तीन उड्डाणपुल तयार करण्यात येत आहे. यातील अन्य दोन पुलाचे काम केले जात असून दुसऱ्या पुलाचे लोकार्पण येत्या १९ फेब्रुवारीला केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून