मीरा-भाईंदर शहरात डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो धावणार

  88

मीरा-भाईंदर (प्रतिनिधी): मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग १ चे काम जलदगतीने सुरू असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून, डिसेंबर २०२५ मध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे. मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होती. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्यावाचत आणि भविष्यातील बोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर उपस्थितीत होते. यावेळी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० पैकी ३ मार्गिका या अवजड वाहनांसाती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याचावत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्त संजम काटकर यांनी दिली. मिरा भाईंदर शहरात दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९ तयार करण्यात येत आहे, कंत्राटदाराला देखील २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या या प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गकिचे काम पूर्ण केले जात आहे. या मेट्रो मार्गीका ९ चे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. दहिसर ते सुभाषचंद्र बोस पर्यंत टप्पा-१ आणि पुढील टप्प्यात उत्तन पर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. दुसऱ्या टण्यात मेट्रो मार्ग आणि कारशेडचे काम केले जाणार आहे. मेट्रो मार्गकिच्या मूळ मार्गावर स्थानिक नागरिकांची घरे बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध असल्याने त्यावर पुढील महिन्यात एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेऊन घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रपत्न केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली, मिरा भाईंदर शहराच्या मुख्यमार्गावर मेट्रो रेल्वे खाली तीन उड्डाणपुल तयार करण्यात येत आहे. यातील अन्य दोन पुलाचे काम केले जात असून दुसऱ्या पुलाचे लोकार्पण येत्या १९ फेब्रुवारीला केले जाणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या