जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवरील चकमकीत ७ पाकिस्तानी घुसखोर ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीममधील जवान आणि अतिरेकी यांचा समावेश आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ मधील कृष्णा खोऱ्याजवळ घडली.पाकिस्तानी घुसखोरांची भारतीय सैन्याच्या आघाडीच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाई करुन कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचे (बॅट) तीन ते चार सदस्यही ठार झाले आहेत. ही टीम सीमापार ऑपरेशन्समध्ये तरबेज असून या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे.या कारवाईत मारले गेलेले अतिरेकी अल बद्र ग्रुपचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे सांगितले होते. यानंतर हा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.
Comments
Add Comment

Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या

Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला

EPFO : युपीआयद्वारे पीएफ धारकांचे पैसे काही सेकंदांत खात्यात मिळणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा

परदेशी नागरिकांसाठी व्हिसा नियमात बदल

केंद्र सरकारकडून नोंदणी प्रक्रिया अधिक कडक; लहान मुलांना दिलासा नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांचे

'Rudram-2' : 'रुद्रम-२' क्षेपणास्त्राची सुखोईवरून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सज्जतेत आज आणखी एक मोठी भर पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली