जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवरील चकमकीत ७ पाकिस्तानी घुसखोर ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीममधील जवान आणि अतिरेकी यांचा समावेश आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ मधील कृष्णा खोऱ्याजवळ घडली.पाकिस्तानी घुसखोरांची भारतीय सैन्याच्या आघाडीच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाई करुन कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचे (बॅट) तीन ते चार सदस्यही ठार झाले आहेत. ही टीम सीमापार ऑपरेशन्समध्ये तरबेज असून या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे.या कारवाईत मारले गेलेले अतिरेकी अल बद्र ग्रुपचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे सांगितले होते. यानंतर हा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे