गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता, पाच वर्षांनंतर RBI चा व्याजदर कपातीचा निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो दरात व्याजदर कपात मे २०२० मध्ये केली होती. यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात व्याजदर कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकांकडून मिळणारी गृहकर्ज, वाहनकर्ज आदी प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.



रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. यामुळे रेपो दर (रेपो रेट) ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकारने नव्या करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले. या घोषणेला काही दिवस होत नाहीत तोच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. या लागोपाठच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक उलाढालींना चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.



देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील आणि घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला.
Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा