GBS in Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएसमुळे ६ मृत्यू, राज्यात जीबीएसचे १७३ रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रावर जीबीएस अर्थात गुइलेन - बॅरे - सिंड्रोम (Guillain–Barré syndrome or GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएस अर्थात गुइलेन - बॅरे - सिंड्रोम या आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या सहा जणांपैकी पाच जणांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला आहे. राज्यात जीबीएसचे आतापर्यंत १७३ रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.



जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी पिण्याआधी अथवा खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्याआधी उकळून थंड करुन आणि गाळून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्या. परिसर स्वच्छ राखा. उघड्यावरचे खाणेपिणे टाळा. शुद्ध पाणी प्या, ताजे सकस आणि वातावरणाला अनुकूल असे पदार्थ खा. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करा, परस्पर औषधोपचार करुन घेणे टाळा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



राज्यात आढळलेल्या १७३ जीबीएस रुग्णांपैकी ७२ बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या ५५ जण आयसीयूमध्ये आणि २१ जण व्हेंटिलेटरवर आहेत. इतर जीबीएसबाधितांची स्थिती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Comments
Add Comment

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला