उत्तुंग इमारतींसाठी अग्निशमन दल करणार सीएएफएस आणि ड्रोनचा वापर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - मुंबईत मागील काही वर्षांपासून टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून या उत्तुंग इमारतींचे बांधकाम होत असतानाच त्याठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात असक्षम ठरत आहे. मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये या उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रकार अधिक होत आहेत. त्यामुळे या टोलेजंग इमारतींमध्ये आगीच्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस व ड्रोन सारख्या नवीन अग्निशमन यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५- २६च्या अर्थसंकल्पीय भाषणांत बोलतांना मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सध्या उत्तुंग इमारती बांधल्या जात आहे, त्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटना घडल्यास त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक इमारतींमध्ये यंत्रणा असली तरी बऱ्याच वेळेला त्या कार्यान्वित नसतात. त्यामुळे या उत्तुंग इमारतींमध्ये क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस चा वापर केल्यास ३०० ते ४०० मीटर उंचीपर्यंत अर्थांत १०० मजल्यापर्यंतच्या इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवता येवू शकते.



तसेच ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून मुंबई अग्निशमन दलात ड्रोनचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. परंतु ६७ मीटर पेक्षा अधिक उंचीपर्यंत या ड्रोनचा वापर होवू शकत नाही. त्यामुळे या ड्रोनचा वापर अधिक उंचीच्या इमारतींसाठी कसा होवू शकतो याची चाचपणी केली जात असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या