उत्तुंग इमारतींसाठी अग्निशमन दल करणार सीएएफएस आणि ड्रोनचा वापर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - मुंबईत मागील काही वर्षांपासून टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून या उत्तुंग इमारतींचे बांधकाम होत असतानाच त्याठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात असक्षम ठरत आहे. मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये या उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रकार अधिक होत आहेत. त्यामुळे या टोलेजंग इमारतींमध्ये आगीच्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस व ड्रोन सारख्या नवीन अग्निशमन यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५- २६च्या अर्थसंकल्पीय भाषणांत बोलतांना मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सध्या उत्तुंग इमारती बांधल्या जात आहे, त्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटना घडल्यास त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक इमारतींमध्ये यंत्रणा असली तरी बऱ्याच वेळेला त्या कार्यान्वित नसतात. त्यामुळे या उत्तुंग इमारतींमध्ये क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस चा वापर केल्यास ३०० ते ४०० मीटर उंचीपर्यंत अर्थांत १०० मजल्यापर्यंतच्या इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवता येवू शकते.



तसेच ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून मुंबई अग्निशमन दलात ड्रोनचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. परंतु ६७ मीटर पेक्षा अधिक उंचीपर्यंत या ड्रोनचा वापर होवू शकत नाही. त्यामुळे या ड्रोनचा वापर अधिक उंचीच्या इमारतींसाठी कसा होवू शकतो याची चाचपणी केली जात असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा