PNB Recruitment : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळेल बँकेत नोकरी! लाखभर पगार; 'असा' करा अर्ज

  100

मुंबई : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी (Bank Job) आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेत इंटरनल ओम्बड्समॅन पदासाठी भरती (PNB Recruitment) जारी केली आहे. यासाठी अर्ज प्रकिया सुरु झाली असून २२ फेब्रुवारी अंतिम तारीख असणार आहे. विशेषत: यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे इच्छुकांसाठी ही उत्तम सुवर्णसंधी असणार आहे.



इंटरनल ओम्बड्समॅन पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पीएनबीच्या https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, अर्ज करण्याचा इतर कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या नोकरीसाठी (PNB Recruitment) अर्ज करताना २००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.



वयोमर्यादा आणि अनुभव


पंजाब नॅशनल बँकेत नोकरीसाठी ६५ पेक्षा कमी वय असणारे उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तसेच उमेदवाराला बँकेत कामाचा किंवा इतर फायनान्स सेक्टरमध्ये ७ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य असणार आहे. बँकेत जनरल मॅनेजर, फायनान्शियल सेक्टर या विभागात मॅनेजर असणे गरजेचे ठरणार आहे.


या नोकरीसाठी उमेदवारांना ३ वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट कालावधी असणार आहे. यानंतर कामाचा कार्यकाळ वाढू शकतो. या नोकरीसाठी उमेदवाराला दरमहा १.७५ लाख रुपये पगार मिळणार आहे. (PNB Recruitment)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या