शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका

शहापूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व ७/१२ घेऊन आधार सेंटर, सी.एस.सी. सेंटर व तलाठी कार्यालय अशा ठिकाणी धावपळ करून आपले फार्मर आयडी बनविण्यासाठी मागील दहा-पंधरा दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.



शेतकरी आयडी बनवतांना कधी सर्वर डाऊन, तर कधी आधार कार्डवरील माहिती परिपूर्ण असताना बहुतांश केंद्रावर शहापूर तालुका गायब झाल्याचे दिसून येत आहे.कधी शेतकरी फोटो दिसत नाहीत. त्यामुळे पुढील ७/१२ किंवा ओटीपी येणे थांबते. दरम्यान ऑपरेटर देखील खूप प्रयत्न करून सुद्धा नोंदी होत नाहीत याबाबतची माहिती शहापूर तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये खर्च करूनही फार्मर आयडीपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तलाठी कर्मचारी ऑनलाईन तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करत आहेत. तो दूर करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.


तालुक्यातील भातसई, शेरे, शेई, अंबर्जे, मासवणे, नडगाव, डोळखांब, बाबघर इ. भागातील शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही. यामुळे ते हैराण आहेत. पीएम किसानचा १९ वा हप्ता २४ फेबुवारी रोजी वितरित होत असून, फार्मर आयडी अभावीशेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत .

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक