शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका

  572

शहापूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व ७/१२ घेऊन आधार सेंटर, सी.एस.सी. सेंटर व तलाठी कार्यालय अशा ठिकाणी धावपळ करून आपले फार्मर आयडी बनविण्यासाठी मागील दहा-पंधरा दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.



शेतकरी आयडी बनवतांना कधी सर्वर डाऊन, तर कधी आधार कार्डवरील माहिती परिपूर्ण असताना बहुतांश केंद्रावर शहापूर तालुका गायब झाल्याचे दिसून येत आहे.कधी शेतकरी फोटो दिसत नाहीत. त्यामुळे पुढील ७/१२ किंवा ओटीपी येणे थांबते. दरम्यान ऑपरेटर देखील खूप प्रयत्न करून सुद्धा नोंदी होत नाहीत याबाबतची माहिती शहापूर तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये खर्च करूनही फार्मर आयडीपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तलाठी कर्मचारी ऑनलाईन तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करत आहेत. तो दूर करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.


तालुक्यातील भातसई, शेरे, शेई, अंबर्जे, मासवणे, नडगाव, डोळखांब, बाबघर इ. भागातील शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही. यामुळे ते हैराण आहेत. पीएम किसानचा १९ वा हप्ता २४ फेबुवारी रोजी वितरित होत असून, फार्मर आयडी अभावीशेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत .

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या