आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कामाची प्रशंसा

आष्टी : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.


बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. सुरेश धस मागे लागले की डोके खाऊन टाकतात असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.



देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवान : सुरेश धस


मला कुणाकडून अपेक्षा नाही, देवेंद्र बाहुबली मदत करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली. बीड जिल्ह्याची बदनामी होतेय, असे काही लोक म्हणतात. पण काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली होती. संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. कुणालाच सोडणार नाही असे सांगितले.



अजूनही राख, वाळू आणि भूमाफियांना मोका लावला पाहिजे, असे आमदार धस म्हणाले. २०१९ मध्ये पूर्ण बहुमत येऊनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. जनादेश आपल्या बाजूने होता, पण तो पहाटेचा चोरून नेला. फडणवीस यांना राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस करण्याची कटकारस्थाने रचली गेली. पण त्यांनी संघर्ष केला आणि त्यावर मात केली. देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवाल आहेत, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.