Railway Accident : एकाच ट्रॅकवर आल्यामुळे दोन मालगाड्यांची जोरदार धडक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भीषण अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात रेल्वे रुळावर दोन मालगाड्या समोरा समोर येऊन मोठा अपघात झाला आहे. धडक इतकी भीषण होती की इंजिन रेल्वे रूळावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये चालक आणि को पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार फतेहपूर जिल्ह्यातील खगा कोटवाली येथील पँबपिपूरजवळ एक मालगाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.





अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते आहे. अनेक मालवाहतूक गाड्या थांबविल्या गेल्या आहेत. काहींचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन रोको पायलट जखमी असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे