Rahul Solapurkar : 'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले'; मराठी अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. मात्र, या ऐतिहासिक घटनेबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) याने एका मुलाखतीत 'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचे' म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून राहुल सोलापूरकरवर टीका करण्यात येत आहे.



काय म्हणाले राहुल सोलापूरकर?


'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो', असे विधान केले.


दरम्यान, राहुल सोलापूरकरच्या विधानानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी इतिहास विकृत केल्याचा आरोप केला आहे. काहींनी त्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे, तर काहींनी त्यांच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनीही राहुल सोलापूरकरला खडे बोल सुनावले आहेत.



सोलापूरकरांनी विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली


“ राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु "हैवान" असल्याचं सिद्ध केलं आहे. राहुल सोलापूरकरने विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वकर्तृत्वावर आग्र्यातून निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला आहे. जाणीवपूर्वक महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी मी सभागृहात मागणी करेन' असे वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.




 कोण आहेत राहुल सोलापूरकर?


राहुल सोलापूरकर सुप्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून काम केले आहे. थरथराट, व्हेंटिलेटर, नशीबवान, बळीराजाचं राज्य येऊ दे, बालगंधर्व, राजमाता जिजाऊ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच २०१७ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी