Ratnagiri : देवरुखमध्ये हातभट्टीवर छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकला. या छाप्यात ३८ हजाराचे ७५० लिटर गूळ व नवसागरमिश्रित उकळते रसायन बॅलरसहित, ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची अ‍ॅल्युमिनियम डेग तसेच २ हजार १०० रुपयांची वीस लिटर गावठी दारू असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोलीस याबतीत कशी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून पुन्हा एकदा

'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.