रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकला. या छाप्यात ३८ हजाराचे ७५० लिटर गूळ व नवसागरमिश्रित उकळते रसायन बॅलरसहित, ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची अॅल्युमिनियम डेग तसेच २ हजार १०० रुपयांची वीस लिटर गावठी दारू असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोलीस याबतीत कशी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…