बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान

Share

मुंबई(विशेष प्रतिनिधी) – आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिका किती आर्थिक मदत करते यावर सर्वाचे लक्ष लागून होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाकरता महापालिका १००० कोटी रुपयांचा अनुदान देणार असून त्यासाठीच्या निधीची तरतूद आगामी अर्थंसकल्पात केली आहे. याशिवाय इलेक्ट्रीक बसेस खरेदीकरता २५० कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सन २०१२-१३ पासून जानेवारी २०२५ पर्यंत मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास एकूण ११३०४.५९ कोटी एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. सध्याचे हाती घेतलेले प्रकल्प आणि इतर महत्वाच्या उद्दिष्टांकरिता स्वतः मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असतानाही, बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १००० कोटी इतकी तरतूद अनुदान म्हणून प्रस्ताविण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

ही रक्कम बेस्ट उपक्रमास पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्वावरील नवीन बसेस, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च, आयटीएमएस प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी, विद्युत देणी, इत्यादी तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २,००० इलेक्ट्रीक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यासाठीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचा ५% हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी या खर्चापोटी प्रदान करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, विद्युत बसगाड्या खरेदी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाकडून १९९२ कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी, प्राप्त झालेली १४९३.३८ कोटी इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास अधिदानीत करण्यात आली आहे व उर्वरीत ४९८.६२ कोटी इतकी रक्कम १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर बेस्ट उपक्रमास उपलब्ध करुन देण्यात येईल. यातील २५० कोटी रुपये देण्यात आल्याने उर्वरीत २५० कोटी रुपयांची रक्कम ही बेस्टला बसेस खरेदीकरताच वापरता येईल, आणि १००० कोटी रुपयांचे अनुदानाचे बेस्टने काय करावे हे त्यांनी ठरावावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले/

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

12 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

32 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago