UPSC Exam : पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी सतर्क! अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षा देण्याची संधी मिळाण्यासाठी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्याचेही दाखवले होते. या सर्व प्रकारामुळे यूपीएससी आता अलर्ट मोडवर आले आहे. यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ साठी ११ फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून अर्ज प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत.



यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ बाबत साठी लोकसेवा आयोगाने अधिसूचना जारी करुन अर्ज मागवले आहेत. या अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रियेत गेल्यावर्षीच्या तुलनेत काही बदल आयोगाने केले आहेत. या बदलांचे कारण, परिक्षा पद्धती आणि अर्ज प्रक्रियेत बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने केलेला गैरप्रकार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत आहे.



अर्ज प्रक्रियेत कोणते बदल ?



  • या अगोदर तपशीलवार अर्ज भाग१ आणि भाग १ (डॅफ १ आणि डॅफ-२) पूर्व परिक्षेनंतर भरावे लागायचे. मात्र, आता पूर्व परिक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना डॅफ-१ आणि डॅफ-१ मधील तपशील भरावा लागत आहे.

  • विद्यार्थ्यांनी आता पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत जन्मतारीख पुरावा, आरक्षण प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ आरक्षण प्रमाणपत्र इत्यांदीचा क्रमांक सादर करावा लागायचा.

  • मागील वर्षापर्यंत मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सेवा प्राधान्ये (सर्व्हिस प्रीफ्रन्स) द्यावा लागायचा. मात्र, आता विद्यार्थ्यांनी पूर्व परिक्षेचाच अर्ज भरताना त्यांच्या सेवा प्राधान्ये निवडणे आवश्यक आहे.

  • पूर्व परिक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना २०० रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील (सूट दिलेली श्रेणी वगळता).

  • विद्यार्थ्यांना आता पूर्व परीक्षेच्या निकालाच्या १० दिवसांच्या आत त्यांचे कॅडर प्राधान्ये सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी, डॅफ २ मध्ये मुख्य परीक्षेच्या निकालानंतर केंडर पसंती सादर करावी लागत असे.

Comments
Add Comment

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन