कुत्र्याच्या त्रासाला कंटाळून शेजारच्या कुटुंबाला मारहाण

नाशिक : शेजारच्यांनी घराजवळ कुत्री पाळल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायलेकांनी एका कुटुंबास मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना सामनगाव रोड येथे घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती मारुती साठे व आरोपी वंश दिलीप सोनवणे व साधनाबाई दिलीप सोनवणे हे नवीन सामनगाव रोडवरील एकलहरा येथील सिद्धार्थनगरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी साठे यांनी घराजवळ कुत्री पाळली आहे.



या कुत्रीपासून आरोपी सोनवणे यांना त्रास होत आहे. यावरून आरोपी सोनवणे यांनी कुरापत काढून फिर्यादी साठे यांच्यासह त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ केली, तसेच वंश सोनवणे याने फिर्यादीच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले, तर साधनाबाई सोनवणे यांनी साठे कुटुंबीयांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी