कुत्र्याच्या त्रासाला कंटाळून शेजारच्या कुटुंबाला मारहाण

  54

नाशिक : शेजारच्यांनी घराजवळ कुत्री पाळल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायलेकांनी एका कुटुंबास मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना सामनगाव रोड येथे घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती मारुती साठे व आरोपी वंश दिलीप सोनवणे व साधनाबाई दिलीप सोनवणे हे नवीन सामनगाव रोडवरील एकलहरा येथील सिद्धार्थनगरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी साठे यांनी घराजवळ कुत्री पाळली आहे.



या कुत्रीपासून आरोपी सोनवणे यांना त्रास होत आहे. यावरून आरोपी सोनवणे यांनी कुरापत काढून फिर्यादी साठे यांच्यासह त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ केली, तसेच वंश सोनवणे याने फिर्यादीच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले, तर साधनाबाई सोनवणे यांनी साठे कुटुंबीयांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या