GBS : राज्यभरात जीबीएसची रूग्णसंख्या १५० पार!

  138

पुणे : राज्यभरात अनेक ठिकाणी गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून बरे होत असलेल्या ३८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या २८ वरून २१ पर्यंत घटली आहे.



जीबीएस आजाराच्या नवीन नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या १५८ वरती पोहोचली आहे. यापैकी ८३ रुग्ण महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित ३१ रुग्ण पुणे महापालिका, १८ पिंपरी चिंचवड महापालिका, १८ रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आठ आहे. एकूण रुग्णांपैकी २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर ४८ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.


या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण करून आजपर्यंत पुणे पालिकेतील ४० हजार ८०२ घरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ हजार २०३ घरे आणि पुणे ग्रामीणमधील १२ हजार अशा एकूण ६४ हजार ५६७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांमधील १६० पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी पाण्याचे आठ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. (GBS)

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत