New Mahabaleshwar : महाराष्ट्रात सुरु होणार नवे पर्यटनस्थळ!

  325

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हटले की सर्वात आधी महाबळेश्वर समोर येते. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात. अशातच आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात एक नवे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. (New Mahabaleshwar)



महाबळेश्वर पर्यटनाचे आकर्षणाचे स्थळ असून याठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटनस्थळाची रचना करण्यात येणार आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) 'नवीन महाबळेश्वर' या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा,पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील २३५ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता आणखी नव्याने २९४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोप वे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.



'सी प्लेन' प्रकल्प उभारणार


नवीन महाबळेश्वरमध्ये तीन व्यावसायिक विमानतळ प्रस्तावित आहेत. यामध्ये बाजे येथे धावपट्टी, तर उरमोडी, तापोळा येथे 'सी प्लेन' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किमी ते दोन किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्यात येणार आहे. बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल. उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे, तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे, तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे. उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना काही वेळेतच पोहोचता येणार आहे. (New Mahabaleshwar)

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित