Budget 2025 : १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; करदात्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा!

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी (Budget 2025) आनंदाची बातमी दिली आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना हे मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.


काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमर्गींना दिलासा देण्यासंदर्भात संकेत दिले होते. १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ८० हजारांपर्यंत फायदा होणार आहे. तर १२ लाख ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारला जाणार आहे.



यामुळे वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची करात सूट मिळेल. याचा अर्थ, त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.



नव्या करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असल्यास आयकर भरावा लागणार नाही.

तर जुन्या करप्रणालीनुसार अशी असेल कर रचना...



  • ० ते ४ लाखांवर कर नाही

  • ४ ते ८ लाखांवर ५ टक्के कर

  • ८ ते १२ लाखांवर १० टक्के कर

  • १२ ते १६ लाखांवर १५ टक्के कर

  • १६ ते २० लाखांवर २० टक्के कर

  • २० ते २४ लाखांवर २० टक्के कर

  • २४ लाखांच्या पुढे ३० टक्के कर


ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखांपर्यंत वाढवली आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच