Ranji Trophy Delhi : रणजी ट्रॉफीतही विराट कोहलीचा लुटुपुटुचाच खेळ!

  41

दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून (दि. ३०) दिल्लीचा संघ रेल्वे विरुद्ध सामना खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.मात्र, चाहत्यांची आता निराशा झाली आहे. रेल्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. कोहलीला हिमांशू सांगवानने बाद केले.


हरवलेली लय परत मिळवण्यासाठी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने ५व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. २८व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही लगावला. पण पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि थेट स्टंपवर गेला.



कोहलीने १५ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. त्याला बाद करताना हिमांशू सिंगला खूप आनंद झाला असावा. पहिले म्हणजे त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या मोठ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. शुभमन गिल आणि जडेजा वगळता रणजी करंडक सामन्यात कोणीही विशेष काही करताना दिसत नाही आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व