Ranji Trophy Delhi : रणजी ट्रॉफीतही विराट कोहलीचा लुटुपुटुचाच खेळ!

दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून (दि. ३०) दिल्लीचा संघ रेल्वे विरुद्ध सामना खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.मात्र, चाहत्यांची आता निराशा झाली आहे. रेल्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. कोहलीला हिमांशू सांगवानने बाद केले.


हरवलेली लय परत मिळवण्यासाठी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने ५व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. २८व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही लगावला. पण पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि थेट स्टंपवर गेला.



कोहलीने १५ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. त्याला बाद करताना हिमांशू सिंगला खूप आनंद झाला असावा. पहिले म्हणजे त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या मोठ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. शुभमन गिल आणि जडेजा वगळता रणजी करंडक सामन्यात कोणीही विशेष काही करताना दिसत नाही आहे.

Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार