Ranji Trophy Delhi : रणजी ट्रॉफीतही विराट कोहलीचा लुटुपुटुचाच खेळ!

दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून (दि. ३०) दिल्लीचा संघ रेल्वे विरुद्ध सामना खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.मात्र, चाहत्यांची आता निराशा झाली आहे. रेल्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. कोहलीला हिमांशू सांगवानने बाद केले.


हरवलेली लय परत मिळवण्यासाठी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने ५व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. २८व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही लगावला. पण पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि थेट स्टंपवर गेला.



कोहलीने १५ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. त्याला बाद करताना हिमांशू सिंगला खूप आनंद झाला असावा. पहिले म्हणजे त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या मोठ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. शुभमन गिल आणि जडेजा वगळता रणजी करंडक सामन्यात कोणीही विशेष काही करताना दिसत नाही आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील