सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींचा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

क्वालालंपूर : भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंडने वीस षटकांत आठ बाद ११३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने पंधराव्या षटकातच उपांत्य सामना जिंकला. टीम इंडियाने नऊ गडी राखून इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. मोठा विजय मिळवत भारताने दिमाखात विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.



नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या पारुनिका सिसोदियाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पुरती कोंडी झाली. भारताकडून पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्माने प्रत्येकी तीन तर आयुषी शुक्लाने दोन बळी घेतले. इंग्लंडकडून डेविना पेरिनने ४० चेंडूत ४५ आणि ए. नोरग्रोव्हने २५ चेंडूत ३० धावा केल्या. जी. कमलिनी (५६ धावा) आणि गोंगडी तृषा (३५ धावा) यांनी भारताचा विजय सोपा केला.



आता १९ वर्षांखालील मुलींच्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असतील. हा सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे. याआधी २०२३ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : पोर्तुगालचा क्रोएशियावर २-१ ने जोरदार विजय; 'राऊंड ऑफ १६'मध्ये धडक

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या 'राऊंड ऑफ ३२' (Round of 32) सामन्यात पोर्तुगाल (Portugal)ने क्रोएशिया (Croatia)चा २-१ असा

FIFA World Cup 2026 : स्पेनचा दणदणीत विजय! ऑस्ट्रियाला ३-० ने हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक

लॉस एंजेलिस : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या राऊंड ऑफ ३२ (Round of 32) सामन्यात स्पेनने ऑस्ट्रियाचा ३-० असा एकतर्फी

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला