Mumbai Metro : मुंबईत मेट्रोचे बांधकाम कोसळले, वाहतूक कोंडी


मुंबई : चेंबूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पहाटेची वेळ असल्याने या ठिकाणी वर्दळ नसल्याकारणाने दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


चेंबूरमधील सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. वडाळ्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सध्या येथे मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असून सळई व काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहे. यातीलच एक अर्धवट उभारलेला खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला आहे.



कोसळलेल्या सळ्यांची उंची २० फूट लांबीची आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेतला. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पण आता ही घटना घडल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल