Mumbai Metro : मुंबईत मेट्रोचे बांधकाम कोसळले, वाहतूक कोंडी

  85


मुंबई : चेंबूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पहाटेची वेळ असल्याने या ठिकाणी वर्दळ नसल्याकारणाने दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


चेंबूरमधील सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. वडाळ्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सध्या येथे मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असून सळई व काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहे. यातीलच एक अर्धवट उभारलेला खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला आहे.



कोसळलेल्या सळ्यांची उंची २० फूट लांबीची आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेतला. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पण आता ही घटना घडल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड