Aadhaar card : आजपासून महाराष्ट्रातील सगळ्या पोर्टवर आधार कार्ड अनिवार्य

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी करणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे आधार कार्ड आणि मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक आवश्यक


मुंबई : महाराष्ट्र राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशांकडे OR Coded आधार कार्ड (Aadhaar card) जवळ बाळगणे आवश्यक आहे. (Aadhaar card is mandatory at all ports) तसेच इंडियन मर्चट शिपिंग अॅक्टच्या, १९५८ मधील ४३५ (H) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व (सुधारीत २०२१) कलम ६ (४) नुसार भारतातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरूपी दिसेल असे रंगविणे आवश्यकच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला यासंबंधी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी नौकेवरील प्रत्येक खलाशांने स्मार्ट कार्ड / QR Coded आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक राहील. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील, असे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त यांनी दिले आहेत.



जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्थांना कळवून याबाबत सर्व मासेमारी नौका मालकांस अवगत करून खलाशांनी QR Coded आधार कार्ड अथवा स्मार्ट कार्ड जवळ बाळगणे, तसेच नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल, तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बाबतची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. सदर अटी-शर्तीची परिपूर्णता झाल्याशिवाय, कोणत्याही नौकेचा मासेमारी परवान्याचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करु नये, अशा नौका ज्या नोंदणी क्रमांक व कलर कोडचे ठळक पणे प्रदर्शित करीत नाहीत व नौकेवरील खलाशांकडे, QR Coded आधार कार्ड अथवा स्मार्ट कार्ड आढळून येत नाहीत. अशा नौका मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सु-२०२१) अंतर्गत मासेमारी परवाना अटी-शर्तीचा भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत नियमोचीत कार्यवाही करण्यात यावी व करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.


Aadhar Card

या आदेशाद्वारे, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागांना सूचित करण्यात आले आहे की, आदेशात नमूद केल्याप्रमाणे याबाबत अंमलबजावणी करुन त्याप्रमाणे अहवाल मुख्यालयास सादर करावा अन्यथा आपल्यावर नियमोचीत कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,