DCM Ajit Pawar : मकोका लावताना जातपात बघणार नाही ;अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना खडसावले

  72

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा ते बीडच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांच्या अनेक बैठका होणार आहेत. आता नुकताच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील हजर होते. मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप प्रत्यारोपांची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी अजित पवार यांनी बीड जिल्हाकडे लक्ष घातले आहे.



कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "चुकीचे काम केल्यावर मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाहीये. जिल्हातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत. जातपात बघू नका. चुकीच्या पद्धतींना आळा घातला पाहिजे. आपलं चरित्र्य स्वच्छ ठेवा. बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. जे मुद्दे माझ्या स्तरावर सोडवता येतील, ते मी सोडवेल. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील विषय ते सोडवतील. अफवांवर विश्वास ठेऊ नका. पीकविम्याबद्दलच्या तक्रारी तपासल्या जातील. रिल्स वगैरे खपवून घेणार नाही. विटी दांडू, पतंग खेळायला आलो नाही, काम करायला आलोय. तथ्य असेल तर कारवाई होणारच. जातीय सलोखा राखला पाहिजे. चांगले वागा मी तुमच्यासोबत आहे, चुकीचे वागाल तर तुमच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. गंभीर घडले तर मकोका पण लावला जाईल. मला काम करायला आवडतं. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलीये, लवकरच आदेश निघेल. तुम्ही मला साथ द्या, मला सहकार्य करा. जे लोक सातत्याने बीडबद्दल जे सांगत आहेत, ते आपल्याला बदलायचे आहे, "


 

माझ्याकडेही सरड्यासारखा रंग बदलणारी जमात आहे, सरडा बदलणारे सगळीकडे असतात, तसं चालणार नाही. असं म्हणत अजित दादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.


दरम्यान, बीडच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक