DCM Ajit Pawar : मकोका लावताना जातपात बघणार नाही ;अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना खडसावले

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा ते बीडच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांच्या अनेक बैठका होणार आहेत. आता नुकताच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील हजर होते. मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप प्रत्यारोपांची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी अजित पवार यांनी बीड जिल्हाकडे लक्ष घातले आहे.



कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "चुकीचे काम केल्यावर मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाहीये. जिल्हातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत. जातपात बघू नका. चुकीच्या पद्धतींना आळा घातला पाहिजे. आपलं चरित्र्य स्वच्छ ठेवा. बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. जे मुद्दे माझ्या स्तरावर सोडवता येतील, ते मी सोडवेल. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील विषय ते सोडवतील. अफवांवर विश्वास ठेऊ नका. पीकविम्याबद्दलच्या तक्रारी तपासल्या जातील. रिल्स वगैरे खपवून घेणार नाही. विटी दांडू, पतंग खेळायला आलो नाही, काम करायला आलोय. तथ्य असेल तर कारवाई होणारच. जातीय सलोखा राखला पाहिजे. चांगले वागा मी तुमच्यासोबत आहे, चुकीचे वागाल तर तुमच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. गंभीर घडले तर मकोका पण लावला जाईल. मला काम करायला आवडतं. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलीये, लवकरच आदेश निघेल. तुम्ही मला साथ द्या, मला सहकार्य करा. जे लोक सातत्याने बीडबद्दल जे सांगत आहेत, ते आपल्याला बदलायचे आहे, "


 

माझ्याकडेही सरड्यासारखा रंग बदलणारी जमात आहे, सरडा बदलणारे सगळीकडे असतात, तसं चालणार नाही. असं म्हणत अजित दादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.


दरम्यान, बीडच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार