Indian fishermen : श्रीलंकेने केली ६ भारतीय मासेमारांची सुटका

चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटका झालेले ६ भारतीय मासेमार आज, गुरुवारी चेन्नईत पोहोचले. विमानतळावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


अलीकडेच, श्रीलंकेच्या नौदलाने १३ मच्छिमारांना पकडले होते. या काळात त्यांच्यावर गोळीबारही झाला, ज्यामध्ये २ मासेमार गंभीर जखमी झाले. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. श्रीलंकेच्या नौदल प्रमुखांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे सांगितले.



जाफना येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी जखमी मासेमारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली होती. आम्ही मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहोत. तसेच मच्छिमारांवर बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत 'स्वीकारार्ह नसल्याचे भारताना म्हंटले होते. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मासेमारी जहाजाने क्षेत्र सोडण्याच्या सूचनांचे पालन न केल्याच्या संशयावरून नौदलाने ते ताब्यात घेतले होते.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची