Indian fishermen : श्रीलंकेने केली ६ भारतीय मासेमारांची सुटका

चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटका झालेले ६ भारतीय मासेमार आज, गुरुवारी चेन्नईत पोहोचले. विमानतळावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


अलीकडेच, श्रीलंकेच्या नौदलाने १३ मच्छिमारांना पकडले होते. या काळात त्यांच्यावर गोळीबारही झाला, ज्यामध्ये २ मासेमार गंभीर जखमी झाले. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. श्रीलंकेच्या नौदल प्रमुखांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे सांगितले.



जाफना येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी जखमी मासेमारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली होती. आम्ही मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहोत. तसेच मच्छिमारांवर बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत 'स्वीकारार्ह नसल्याचे भारताना म्हंटले होते. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मासेमारी जहाजाने क्षेत्र सोडण्याच्या सूचनांचे पालन न केल्याच्या संशयावरून नौदलाने ते ताब्यात घेतले होते.

Comments
Add Comment

नितीन नवीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या

जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून

मोदींना भेटण्यासाठी UAE चे राजे ४.२० वाजता दिल्लीत येणार आणि ०६.०५ वाजता मायदेशी रवाना होणार

नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिराती अर्थात UAE चे राजे आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सोमवारी भारतात

नणंद भावजयीचा वाद ; मालमत्ता वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय

Sunjay Kapur Property Case: कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर