राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यम - मुनगंटीवार

पुणे : राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात. मात्र, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


ते पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये बोलत होते. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘आदर्श आमदार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अशा पुरस्कारामुळे शंभरपट अधिक शक्तीने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री राज्यसभा सदस्य श्री. भागवत कराड, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमित गोरखे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी युवकांना अनेक उदाहरणे आणि कथांच्या संदर्भातून राजकारणाचे आणि त्यातील गांभीर्याचे महत्त्व पटवून दिले.


राजकारण म्हणजे निवडणूक हा चुकीचा समज आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारणाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी असावा असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. देश बदलायला हवा, देश पुढे जायला हवा, असे प्रत्येकाला वाटते मात्र हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. राजकारण त्या परिवर्तनाची संधी देते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली.राजकारणातून अनेक चिरकाल परिवर्तनकारी कार्य करण्याची संधी मिळते. राजकारणात न जाण्याचा सल्ला देणे हा चुकीचा भ्रम आहे. गोरगरीब, शोषीत वंचितांचे मन जिंकण्याचे माध्यम म्हणजे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.


युवा संसदेचे उत्तम आयोजन आणि नियोजनाबद्दल त्यांनी डॉ. सुधाकरराव जाधवर व शार्दुल जाधवर यांचे अभिनंदन केले. वनमंत्री असताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गेल्याची आठवण श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली.जनतेच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेण्याचे कार्य राजकारणातून होते, असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Comments
Add Comment

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी

Niranjan Davkhare: शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी, आमदार डावखरेंचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने खरं फुटेज दाखवलं नाही; पत्रकार परिषद घेत दिव्या शिंदेचा गंभीर आरोप

मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील

NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना