आमदार धसांनी ज्यूस पाजला, जरांगेंचे उपोषण स्थगित

जालना : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मारण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंचे आंदोलन नवी मुंबईत स्थगित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पिऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली होती. शासनाने जरांगेंच्या मागण्या मान्य करणारे निर्णय घेतले. या घटनेला काही महिने झाल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या हातून ज्युस पिऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.



राज्य शासन आश्वासन दिल्याप्रमाणे कागदपत्रांची छाननी करुन योग्य ती जात प्रमाणपत्र देत आहे. मोडी लिपितील जुन्या कागदपत्रांचीही छाननी होत आहे. पण बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये निवडक सरकारी अधिकारी जातीवादी आहेत. ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत. या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार चालवला आहे. अधिकाऱ्यांकडून नियमानुसार पैसे मिळत नाही म्हणून काही मोडी लिपी अभ्यासक काम सोडून गेले आहेत. याचा फटका मराठा तरुणांना बसत आहे; अशी तक्रार मनोज जरांगेंनी केली. त्यांनी धस यांच्याकडून ज्यूस पिऊन उपोषण स्थगित करताना सरकार पक्षपात करणाऱ्यांवर कारवाई करेल, या आश्वासनावर विश्वास ठेवत असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने आश्वासन पाळले नाही तर मुंबईत आंदोलन करणार. मुंबईत अडवणुकीचा प्रयत्न झाला तर थेट मंत्री आणि त्यांच्या मुलांनाच चोपणार; असा धमकीवजा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.



याआधी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळुंके यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली. सरकार जरांगेंच्या मागण्यांवर आवश्यक ती कृती करेल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी जरांगेंना दिले. यानंतर पक्षपात करणाऱ्यांवर कारवाई होईल या आश्वासनावर विश्वास ठेवत उपोषण स्थगित केल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय