आमदार धसांनी ज्यूस पाजला, जरांगेंचे उपोषण स्थगित

जालना : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मारण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंचे आंदोलन नवी मुंबईत स्थगित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पिऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली होती. शासनाने जरांगेंच्या मागण्या मान्य करणारे निर्णय घेतले. या घटनेला काही महिने झाल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या हातून ज्युस पिऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.



राज्य शासन आश्वासन दिल्याप्रमाणे कागदपत्रांची छाननी करुन योग्य ती जात प्रमाणपत्र देत आहे. मोडी लिपितील जुन्या कागदपत्रांचीही छाननी होत आहे. पण बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये निवडक सरकारी अधिकारी जातीवादी आहेत. ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत. या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार चालवला आहे. अधिकाऱ्यांकडून नियमानुसार पैसे मिळत नाही म्हणून काही मोडी लिपी अभ्यासक काम सोडून गेले आहेत. याचा फटका मराठा तरुणांना बसत आहे; अशी तक्रार मनोज जरांगेंनी केली. त्यांनी धस यांच्याकडून ज्यूस पिऊन उपोषण स्थगित करताना सरकार पक्षपात करणाऱ्यांवर कारवाई करेल, या आश्वासनावर विश्वास ठेवत असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने आश्वासन पाळले नाही तर मुंबईत आंदोलन करणार. मुंबईत अडवणुकीचा प्रयत्न झाला तर थेट मंत्री आणि त्यांच्या मुलांनाच चोपणार; असा धमकीवजा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.



याआधी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळुंके यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली. सरकार जरांगेंच्या मागण्यांवर आवश्यक ती कृती करेल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी जरांगेंना दिले. यानंतर पक्षपात करणाऱ्यांवर कारवाई होईल या आश्वासनावर विश्वास ठेवत उपोषण स्थगित केल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात