Champions Trophy आधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

  49

मुंबई: दीर्घकाळापासून भारताचा स्पिनर कुलदीप यादव टीम इंडियाचा भाग नाही आहे. मात्र हा गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. खरंतर कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट पास केली आहे. याआधी नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये २६ जानेवारीला कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट झाली होती.


असे मानले जात आहे की रणजी ट्रॉफीमध्ये कुलदीप यादव उत्तर प्रदेशसाठी शेवटच्या राऊंडमध्ये खेळताना दिसू शकतो. गुरूवारपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये आमनेसामने असतील.



इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार कुलदीप?


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुलदीप यादवच्या फिटनेसच्या समस्या असतानाही त्याला संघाचा भाग बनवण्यात आले होते. दरम्यान, आता टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर येत आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी येत आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होत आहे. जर कुलदीप यादव इंग्लंड मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग ११चा भाग असेल तर गोलंदाजी आक्रमण निश्चितपणे अधिक मजबूत होईल.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र