Champions Trophy आधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: दीर्घकाळापासून भारताचा स्पिनर कुलदीप यादव टीम इंडियाचा भाग नाही आहे. मात्र हा गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. खरंतर कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट पास केली आहे. याआधी नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये २६ जानेवारीला कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट झाली होती.


असे मानले जात आहे की रणजी ट्रॉफीमध्ये कुलदीप यादव उत्तर प्रदेशसाठी शेवटच्या राऊंडमध्ये खेळताना दिसू शकतो. गुरूवारपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये आमनेसामने असतील.



इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार कुलदीप?


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुलदीप यादवच्या फिटनेसच्या समस्या असतानाही त्याला संघाचा भाग बनवण्यात आले होते. दरम्यान, आता टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर येत आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी येत आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होत आहे. जर कुलदीप यादव इंग्लंड मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग ११चा भाग असेल तर गोलंदाजी आक्रमण निश्चितपणे अधिक मजबूत होईल.

Comments
Add Comment

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना