पुण्यातील भारत - इंग्लंड सामन्यावर GBS चे संकट, प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर जीबीएस अर्थात गुइलेन - बॅरे - सिंड्रोम या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यांना गुइलेन - बॅरे - सिंड्रोम हा आजार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला आहे. या रुग्णांच्या आणखी वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. रुग्णांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी उपचार सुरू आहेत. पण जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.



प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये सर्वांना दर्जेदार पदार्थ मिळतील आणि पिण्यासाठी किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी मिळेल याची खबरदारी घेतली जाणार आहे. सामन्याची पूर्वतयारी म्हणून गवतावर फवारण्यासाठीही किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी वापरले जात आहे. स्टेडियममध्ये स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. यामुळे मालिकेत भारताकडे २ - १ अशी आघाडी आहे. पुण्यातील सामना भारताने जिंकला तर शेवटचा सामना होण्याआधीच भारत ही मालिका ३ - १ अशी जिंकेल. पण पुण्यातील सामना बरोबरीत सुटला अथवा अनिर्णित राहिला किंवा कोणत्याही कारणाने रद्द झाला तर भारताकडे असलेली आघाडी कायम राहील. पुण्यातील सामना इंग्लंडने जिंकला तर तर पाहुणा इंग्लंड आणि यजमान भारत मालिकेत २- २ अशी बरोबरी साधतील. मालिकेत बरोबरी साधली गेली तर मुंबईतील सामना मालिकेच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

पुण्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार

पुण्यातील खेळपट्टी आधी फलंदाजीला आणि नंतर फिरकीला मदत करेल, असा अंदाज आहे. दुसऱ्या डावाच्या सुमारास खेळपट्टी संथ होत जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे पुण्यातील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजीचा पर्याय निवडून खेळपट्टीचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याआधी राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही खेळपट्टी संथ झाली. यामुळे राजकोटमध्ये धावांचा पाठलाग करणे भारताला कठीण झाले आणि टीम इंडियाने सामना गमावला होता.



भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी २० मालिका
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू

  1. पहिला सामना - कोलकाता - भारत ७ गडी राखून विजयी

  2. दुसरा सामना - चेन्नई - भारत २ गडी राखून विजयी

  3. तिसरा सामना - राजकोट - इंग्लंड २६ धावांनी विजयी

  4. चौथा सामना - पुणे - ३१ जानेवारी २०२५ रोजी होणार सामना

  5. पाचवा सामना - मुंबई - २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार सामना


 
Comments
Add Comment

IPL 2026 MI vs SRH : वानखेडेवर मुंबईचा पुन्हा पराभव, हैदराबादचा दमदार ६ विकेट्सने विजय

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद ने मुंबई इंडियन्स ला ६ विकेट्सने पराभूत करत शानदार

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा