Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान म्हणाले...

दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोघेही दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत, लाडकी बहीण योजनेबाबत, वाढत्या GBS व्हायरस बद्दल आणि बुलढाण्यातील केस गळती समस्येबाबत अनेक प्रश्न विचारले.




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी साहित्य संमेलनाबाबत काय म्हणाले?


" मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देशाच्या राजधानीत होणारं साहित्य संमेलन जगभरातील मराठी माणसांकरिता अभिमानाची बाब आहे. विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल असा माझा विश्वास आहे. या संमेलनासाठी ७० लोकांची टीम कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संमेलनात येण्यासाठी होकार दर्शवला आहे. या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत लागल्यास ती निच्छितपणे देण्यात येईल. हे संमेलन कोण्याएकाच नसून तमाम मराठी बांधवांचं आहे."



पुढे फडणवीस म्हणाले, "प्रयागराजमध्ये घडलेल्या घटनांचा मी आढावा घेतला आहे. तिथे अडकलेल्या लोकांशी माझं बोलणं झालं असून उत्तर प्रदेशातील सरकारने माझ्याशी समन्वय साधला आहे. धनंजय मुंडे आणि माझी भेट हा योगायोग आहे. आम्ही दोघेही आमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आलो आहोत. धनंजय मुंडे हे आमचे मंत्री आहेत त्यांना भेटायची चोरी नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित दादांची भूमिका ही अधिकृत आहे.पुण्यात उदभवलेल्या वाढत्या GBS व्हायरसचे रुग्ण पहिल्यांदा आढळलेले नाही यापूर्वीही आढळले आहेत. नांदेड भागात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमागे विहिरीतील दूषित पाणी आहे. लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये आढळून आलेल्या अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येईल तसेच त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे याबाबत सक्रिय आहेत."



दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यादरम्यान आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील