महापालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध-स्वच्छ पाण्याचा पुरवठा! अफवांवर विश्वास नको

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालिकेतर्फे आवाहन


मुंबई : पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, त्यामुळे समाज माध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन मंगळवारी पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच मुंबईकरांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ४००० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना आणि आयएस १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.


पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (१३६५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणाकरिता आणले जाते. या पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.


एकूणच मुंबईकरांना दररोज शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा

 मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड

Mumbai Crime: मुंबईत खळबळ! RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ACB च्या जाळ्यात; 4 हजारांची लाच घेताना अटक

Crime News: सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे प्रादेशिक

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक वाहतुकीला

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार

विश्वासात घेतलं, घरात प्रवेश मिळवला अन् 25 लाखांचा डल्ला! अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास

BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ

- ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या