Ratnagiri : “नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला भरघोस प्रतिसाद!

  62

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विभागाने आज राज्यस्तरीय क्विझ आयटी टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन केले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे पंधरावे वर्ष आहे.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाइल क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे नजीर नाईक उपस्थित होते. या अनोख्या ऑटो एक्स्पोचे त्यांनी कौतुक केले. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


यावेळी व्यासपीठावर नजीर नाईक यांच्यासह नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलिमिया परकार, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, सीएस-आयटी विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल उपस्थित होत्या.



श्री. हेगशेट्ये यांनी ऑटो एक्स्पो आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करतानाच वेगळा विचार करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, फक्त त्याला चालना देण्याची गरज असते, असे नमूद केले. आजपर्यंत अशा एक्स्पोच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले.


श्री. नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. एक्स्पोमध्ये २०० सीसी ते १४०० सीसी क्षमता असलेल्या ३ लाखांपासून ते २२ लाखांपर्यंतच्या सुमारे ७० दुचाकी, तसेच चारचाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे १५ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीबरोबरच चिपळूण, राजापूर, संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या. डुकाटी कंपनीच्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या दोन मॉडेल्सपैकी एक मॉडेल या एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. एक्स्पो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.

Comments
Add Comment

गणेश विसर्जनासाठी आता आखणार चिन्हांकित रेखा

मुंबईतील समुद्रात पालिका बसवणार दिशानिर्देशक सौर दिवे मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण

ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील

Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी