Ratnagiri : “नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला भरघोस प्रतिसाद!

  89

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विभागाने आज राज्यस्तरीय क्विझ आयटी टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन केले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे पंधरावे वर्ष आहे.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाइल क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे नजीर नाईक उपस्थित होते. या अनोख्या ऑटो एक्स्पोचे त्यांनी कौतुक केले. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


यावेळी व्यासपीठावर नजीर नाईक यांच्यासह नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलिमिया परकार, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, सीएस-आयटी विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल उपस्थित होत्या.



श्री. हेगशेट्ये यांनी ऑटो एक्स्पो आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करतानाच वेगळा विचार करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, फक्त त्याला चालना देण्याची गरज असते, असे नमूद केले. आजपर्यंत अशा एक्स्पोच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले.


श्री. नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. एक्स्पोमध्ये २०० सीसी ते १४०० सीसी क्षमता असलेल्या ३ लाखांपासून ते २२ लाखांपर्यंतच्या सुमारे ७० दुचाकी, तसेच चारचाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे १५ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीबरोबरच चिपळूण, राजापूर, संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या. डुकाटी कंपनीच्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या दोन मॉडेल्सपैकी एक मॉडेल या एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. एक्स्पो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी