Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; कोर्टाने दिली पुढची तारीख!

नवी दिल्ली : राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Local body elections) वारे वाहू लागले आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी या निवडणुकासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला आहे. राज्यसरकार व याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले की सर्वपक्षीय सहमती झाल्यामुळे राजकीय पक्षात ओबीसी आरक्षण प्रश्नी कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडत चालल्या आहेत. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. मात्र कारणोत्सव यासंदर्भातील सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीमध्ये प्रभागरचनेचा तिढा सुटेल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी पोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.


दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी निर्णय झाल्यास राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह २७ महानगरपालिका, २५७महापालिका, २६ जिल्हा परिषदा व २८९ पंचायत समित्या, सहकारी बँका व सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योग्य निकाल लागल्यास या निवडणुका एप्रिल किंवा मे २०२५ मध्ये होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा