दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यार्थिनींना बुरखा बंदी करा

  77

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : दहावी- बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी होत असते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेऊन केली आहे.


याबाबत मंत्री नितीश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. इयत्ता १० व १२ वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहे. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात.



याप्रकरणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्य शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होणे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनी या चेहऱ्यावर बुरखा घालून दहावी बारावीच्या परीक्षा देत असतात. परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनिक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. बुरख्याच्या आड इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून सहज कॉपी करू शकता आणि त्याचा परिणाम परीक्षेला बसलेल्या अन्य सर्व विद्यार्थ्यांना भोगावे लागू शकतो, अशी भीती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे यावेळी बोलताना व्यक्त केली.


त्यामुळे जर, परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल, असं नितेश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ